मुंबई : राज्यात ऑक्सिजन गतीने आणण्यासाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ऑक्सिजन इतर राज्यातून येण्यासाठी उशीर होत आहे. विशाखापट्टणमहून ट्रेन येत आहे, पण उशीर झाला आहे. आता ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जाणार आहेत. एअरफोर्स माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जाणार आहे. यामुळे ऑक्सिजन मिळण्यात गती प्राप्त होईल, असेही टोपे म्हणाले.
आज पंतप्रधान मोदी यांनी कोरोना सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांशी चर्चा केली. 9 ते 10 मुख्यमंत्री या कॉन्फरन्सला उपस्थित होते. या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते. ते म्हणाले, ऑक्सिजन देताना आपली संख्या 7 लाख आहे त्यात 10 टक्के क्रिटिकल होतात. न्यायिक पद्धतीने मिळावे ही मागणी केली. मुख्यमंत्री ठाकरेंनी ऑक्सिजन, रेमडेसीविर आणि लस न्याय हक्काने मिळाली पाहिजे, असे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडल्याचे टोपेंनी सांगितले.
साखर कारखान्याबाबात शरद पवार साहेबांनी सूचना दिल्या आहेत. सिलेंडर मागवले आहेत. जमेल त्या मार्गाने कशी उपलब्धता वाढवता येईल यासाठी प्रयत्न करतोय. ऑक्सिजन संदर्भात ऑक्सिजन ऑडिट करा. वेस्टेज टाळा, एक राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन जात असताना अडवू नये, अशी सूचना पंतप्रधानांनी दिल्याचे टोपेंनी सांगितले.
टोपे म्हणाले की, रेमडेसिवीर केसेसच्या तुलनेत ते मिळावे, याबाबत योग्य निर्णय केंद्र सरकार घेईल असे वाटतेय. पंतप्रधानांनी सांगितले, काळा बाजार थांबला पाहिजे, राज्याने तसे नियोजन करावे, आम्ही ते करू. एकत्र येऊन एकजुटीने काम करणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्याचे टोपे म्हणाले.