
कहाणी भुकेल्या अमेरिकेची!
जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून ज्या अमेरिकेकडे पाहिलं जातं, तिथे मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू असेल, हे कोणाला सांगूनही पटणार नाही; परंतु आजमितीस तिथं सहातल्या एका माणसाला अन्नपाकिटावर अवलंबून राहावं लागतंय. सामाजिक सुरक्षिततेसाठी लौकिक असणार्या अमेरिकेत अन्नपाकिटावर अवलंबून असणार्यांची संख्या एवढी प्रचंड असेल तर अशा समृद्धीलाच काही प्रश्न विचारावे लागतील. जगाची समृद्धी जसजशी वाढेल तसतशी भूक कमी व्हावी, अशी अपेक्षा आहे; परंतु ते मात्र होताना दिसत नाही.

स्वच्छतेचा मार्ग आणि विकास
भारताच्या ग्रामीण भागांत कोणतेही योग्य स्थानिक प्रशासन अस्तित्वात नाही. शहरांमधील पालिका आणि महापालिकाही राज्य सरकारचे नियंत्रण असल्यामुळे स्वतंत्र नाहीत. सामान्य नागरिक जणूकाही आपल्या जीवनावरील नियंत्रण हरवून बसले असावेत आणि दूरवर बसलेला अधिकारी त्यांना नियंत्रित करीत असावा, अशीच ही स्थिती म्हणावी लागेल. याच कारणामुळे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत. स्वच्छतेसाठी लोकांना प्रेरित करून पंतप्रधानांनी स्वागतार्ह पाऊल टाकले आहे; परंतु संसाधने आणि व्यवस्था उत्तम ठेवणे हे शासनाचेच काम आहे.

श्रमशक्तीनिर्मितीचे आव्हान
देशभरात दरवर्षी एक कोटी युवक पदवीधर होऊन रोजगार बाजारात दाखल होतात; परंतु यातील बहुतांश युवक बाजारपेठेच्या मागणीनुरूप योग्य नसतात हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. भारतासमोर मोठे आव्हान सध्या आपल्याकडील शिक्षणव्यवस्था ज्ञानाधारित बनविणे हे आहे. आजच्या परिस्थितीत ज्यांना अनिश्चिततांचा मुकाबला करता येईल आणि सातत्याने होत असलेल्या परिवर्तनाला जे सामोरे जाऊ शकतील, अशा मनुष्यबळाला अधिक मागणी असल्याचे दिसत आहे.

स्वराज्याचा आधारवड
जिजामाता या हिम्मतवान, कर्तृत्ववान आणि बुद्धिमान होत्या. त्या प्रजेला अत्यंत मायेने वागविणार्या, स्वराज्याचा आधारवड होत्या. जसे त्यांनी शिवरायांना घडविले, तसेच नातू संभाजीराजांनादेखील घडविले. त्यांनी आपले क्रांतीकारक पती शहाजीराजे यांच्या महत्त्वाकांक्षी आणि शौर्यशाली कार्यकर्तृत्वाला तशीच खंबीरपणे साथ दिली.