
‘लाल परी’ कधी घेईल भरारी?
इंधनाचे वाढते दर, थकीत सरकारी अनुदान, प्रवाशांची घटलेली संख्या, कर्मचार्यांबरोबरचे वेतन करार, ’कोरोना’मुळे प्रवासी वाहतुकीवर असलेले निर्बंध, टाळेबंदी अशा विविध कारणांमुळे ‘एसटी’ महामंडळ प्रचंड तोट्यात गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिकीट दरात वाढ केल्याचे सांगितले जात आहे. असो; पण त्यामुळे ‘लाल परी’ पुन्हा भरारी घेईल असे नाही. कारण समस्या अनेक आहेत. त्यावर कायमचा तोडगा काढणे अगत्याचे आणि तातडीचे आहे.

मुद्दा कृषीकर्जाचा
जिल्हा परिषदअंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या याजनेमुळे इच्छुक, पात्र शेतकर्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे प्रत्यक्षात खरे ठरावे, ही अपेक्षा आहे.

‘आवाज नाय पायजे...!’
निमित्त दिवाळीचे असो की, इतर कुठल्या सण -समारंभाचे, आपल्याकडे बेभान होवून फटाके फोडण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. फटाक्यांपासून होणार्या सर्व त्रासांचा आणि धोक्यांचा विचार केला, तर ‘फटाक्याचा आवाज नाय पायजे!’ असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि तो प्रामाणिकपणे अंमलातही आणला पाहिजे.

फुटीचा शाप
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचे बाकी कोणी नसले तरी भाजपने मनापासून स्वागत केले आहे. पंजाबमधील काँग्रेस फुटीचा लाभ भाजप, आम आदमी पक्ष, अकाली दल, बसपला मिळू शकतो, हे खरेच; पण बंडखोर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचेे राजकीय भवितव्य काय असेल, हे येणारा काळच ठरवेल.

महिलांचा राजकीय टक्का
भारतीय राजकारणामध्ये पहिल्यापासूनच पुरुषांची मक्तेदारी राहिली असून आताच्या आधुनिक काळातही महिलांची उणीव जाणवते आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचे घोषित करून काँग्रेसने आपली राजकीय धोरणदिशा स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करावेच लागेल.

धोक्याची घंटा
केरळमध्ये कालच्या रविवारी मुसळधार पावसाने 26 लोकांचे बळी घेतले आहेत. तेवढेच बेपत्ता असल्याची बातमी आहे. सततची नैसर्गिक संकटे ही धोक्याचीच घंटा ठरली असून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर मात करणे गरजेचे, तातडीचे झाले आहे. त्यासाठीच तथाकथित विकासाची दिशा बदलावी लागणार आहे. देवाची जागा घेवू पाहणार्या मानवाने आतातरी जागे व्हावे लागणार आहे.

बंडोबा होतील थंड?
राहुल गांधी जोपर्यंत पक्षाध्यक्षपद स्विकारत नाहीत तोपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच हे पद राहणार आहे. त्यामुळे ‘जी 23’ नेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे. या बंडखोर नेत्यांना एकतर थंड होत गांधी कुटुंबियांशी जुळवून घ्यावे लागेल, नसता त्यांना काँग्रेसचा ‘हात’ सोडणे भाग पडेल. सोनिया गांधी यांनी त्यासाठीच निणार्यकी भाषा केलेली दिसते.

दसर्याची भेट
आमदारांच्या स्थानिक विकास निधीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. हा अनुभव असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी दसर्याच्या शुभ मुहूर्तावर आमदारांना वाढीव निधीची भेट देत नवे काही करून दाखविण्याची संधी दिली आहे. या निधीचे, संधीचे सोने करण्याची आण आता आमदारांनी घेतली पाहिजे.

शुभेच्छा आणि अपेक्षा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना मिळाला आहे. तेव्हा त्यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्याकडून अपेक्षाही बाळगल्या जात आहेत. अपेक्षा हीच की, त्यांनी दुर्गेचे रुप घेत दुर्जनावर धाक बसवावा आणि महिलांवर होणार्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडावी; महिलांना कुटुंबात आणि समाजात सन्मानाने जगता यावे, अशी परिस्थिती निर्माण करावी.